नगर प्रतिनिधी (दि.६.जानेवारी):-अहमदनगर येथील यतीमखाना ॲण्ड बोर्डींग संस्थेतील तीन मुले भोजनासाठी न आल्याने शोध घेउन आढळून न आल्याने कोतवालीत गुन्हा दाखल करण्यात आला होता.अखेर ते मुले नातेवाईकांकडे मिळून आल्याची माहिती संस्थेचे अधीक्षक शेख गुफरान रफिक यांनी दिली.अहमदनगर यतीमखाना अँड बोर्डींग या संस्थेतील विदयार्थी शेख मोईन वसीम,शेख आयान सादिक,शेख रेहान वसीम हि तिन्ही मुले दि.०४ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता भोजनासाठी इतर मुलांबरोबर दिसुन न आल्यामुळे संस्थेतील कर्मचारी यांनी त्याचा शोध घेतला असता आढळून न आल्यामुळे त्यांच्या पालकांशी संपर्क करुन हि मुले घरी आले आहे का याची माहिती घेतली असता ते घरी परत आले नसल्यामुळे अखेर संस्थेचे अधीक्षक शेख यांनी कोतवाली पोलीस स्टेशन येथे मुले हरविल्या बाबत गुन्हा दाखल केला होता.परंतु सदर मुलांचे शोध घेण्यासाठी पालकांच्या मदतीने संस्थेचे कर्मचारी यांनी शोध घेतला असता हि तिन्ही मुले नातेवाईकांकडे सुखरुप मिळुन आलेली आहे.संस्थेद्वारे मुलांची सुरक्षतेची योग्य ती काळजी तसेच सांगली संगोपन करण्यात येत आहे.असे प्रसिध्दी पत्रकाद्वारे शेख यांनी कळविले आहे.
Trending Topics:
Trending
- लोकराजाला वंदन! रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रकडून राजर्षी शाहू महाराजांना जयंतीदिनी अभिवादन
- अवैध वाळू माफियांनी पोलिसांच्याच अंगावर घातला थेट जेसीबी,कुठे घडली घटना वाचा सविस्तर
- मोहरमच्या पार्श्वभूमीवर तब्बल ४३२ जण तडीपार पोलिसांच्या ‘त्या’ लिस्टमध्ये कोणाकोणाची नावे? शहरात छावणीचे स्वरूप:ड्रोन कॅमेरे,कोम्बिंग ऑपरेशन आणि तगडा बंदोबस्त शांतता भंग केल्यास आता खैर नाही..
- एकाच छताखाली ५० जणांची मोफत रक्त तपासणी;जिल्हा रुग्णालय आणि संपूर्ण सुरक्षा केंद्राचा पिंपळगाव माळवीत मोठा उपक्रम..!
- संगमनेर बसस्थानकावर सापडलेल्या ‘त्या’ वृद्धाचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू..पण वारसदार गायब..ओळख पटविण्यासाठी संगमनेर शहर पोलिसांचे नागरिकांना आवाहन..
- गुन्हेगारांपेक्षा पोलीस दोन पावले पुढे..! तोफखाना पोलिसांनी दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या अट्टल चोरांना कसं जेरबंद केलं? वाचा सविस्तर!”
- नेवासा येथील दोघांचे गुन्ह्यात बळजबरीने नाव टाकल्याचे प्रकरण भोवले;राष्ट्रपती पोलीस पदक विजेते पीएसआय राजेंद्र वाघ निलंबित!
