नगर प्रतिनिधी (दि.६.जानेवारी):-अहमदनगर येथील यतीमखाना ॲण्ड बोर्डींग संस्थेतील तीन मुले भोजनासाठी न आल्याने शोध घेउन आढळून न आल्याने कोतवालीत गुन्हा दाखल करण्यात आला होता.अखेर ते मुले नातेवाईकांकडे मिळून आल्याची माहिती संस्थेचे अधीक्षक शेख गुफरान रफिक यांनी दिली.अहमदनगर यतीमखाना अँड बोर्डींग या संस्थेतील विदयार्थी शेख मोईन वसीम,शेख आयान सादिक,शेख रेहान वसीम हि तिन्ही मुले दि.०४ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता भोजनासाठी इतर मुलांबरोबर दिसुन न आल्यामुळे संस्थेतील कर्मचारी यांनी त्याचा शोध घेतला असता आढळून न आल्यामुळे त्यांच्या पालकांशी संपर्क करुन हि मुले घरी आले आहे का याची माहिती घेतली असता ते घरी परत आले नसल्यामुळे अखेर संस्थेचे अधीक्षक शेख यांनी कोतवाली पोलीस स्टेशन येथे मुले हरविल्या बाबत गुन्हा दाखल केला होता.परंतु सदर मुलांचे शोध घेण्यासाठी पालकांच्या मदतीने संस्थेचे कर्मचारी यांनी शोध घेतला असता हि तिन्ही मुले नातेवाईकांकडे सुखरुप मिळुन आलेली आहे.संस्थेद्वारे मुलांची सुरक्षतेची योग्य ती काळजी तसेच सांगली संगोपन करण्यात येत आहे.असे प्रसिध्दी पत्रकाद्वारे शेख यांनी कळविले आहे.
Trending Topics:
Trending
- प्रभाग 10 मध्ये सविताताई घोडतुरेंची धडाकेबाज एन्ट्री..! विकासाची नवी दिशा..राजकारणाच्या समीकरणात खळबळ!
- निलंबित DYSP असल्याचे खोटे नाटक..! दोन पोलिस शिपायांना ४० लाखांना गंडा अहिल्यानगर मध्ये धक्कादायक प्रकार..!
- मोहटादेवी संस्थानच्या नवीन विश्वस्त मंडळाची घोषणा..! हे असतील विश्वस्त
- अंबरनाथ प्रभाग २५ मध्ये ‘सेवेच्या’ बळावर नवा दमदार चेहरा..स्वप्नाली शिंदे यांची निवडणुकीच्या रिंगणात धमाकेदार एन्ट्री..!
- प्रभाग ७ ला मिळणार विकासाचा नवा ध्यास..सामाजिक कार्यकर्ते संजय ठोंबरे यांची नगरसेवकपदासाठी दमदार दावेदारी..!
- अपंग महिलेशी एसटी कंडक्टरची आरेरावी..सामाजिक कार्यकर्त्या संध्याताई भगत संतप्त..!जबाबदार कर्मचाऱ्यावर निलंबनासह कठोर कारवाई करण्याची मागणी
- अहिल्यानगरची विकासदौड सुरु..! सुशोभीकरण मोहीम झंझावाती वेगात..शहराचा चेहरा मोहरा बदलणारच..आमदार संग्राम जगताप यांचे व्हिजन ठरतेय गेमचेंजर
- “जनतेच्या हक्काची नवी दिशा; प्रभाग १६ मधून जयश्रीताई टकले निवडणुकीच्या मैदानात!”
